शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काँग्रेसच्या नेत्यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:14 IST

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनीच पोलिस कोठडीत खून करून त्याचा मृतदेह आंबोली घाटात जाळल्याच्या प्रकरणात गृहखात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, पोलिसांनी सुपारी घेऊन ही हत्या केल्याचा संशय ...

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिसांनीच पोलिस कोठडीत खून करून त्याचा मृतदेह आंबोली घाटात जाळल्याच्या प्रकरणात गृहखात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, पोलिसांनी सुपारी घेऊन ही हत्या केल्याचा संशय व्यक्त केला.राज्यातील गृहखाते एकीकडे एका गरीब तरुणाच्या हत्येची सुपारी घेते, तर दुसरीकडे अपहरणाची तक्रार असूनही शिवसेनेच्या एका आमदाराला अभय देते. यातूनच सरकारचे खरे रूप समोर येत आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.ते म्हणाले की, मुंबईत काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आ. प्रकाश सुर्वे यांच्यावर एका तरुणाने अपहरणाची तक्रार केली होती. सत्तेतील घटकपक्षाचा आमदार म्हणून गृहखात्याने या प्रकरणात आलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. धनदांडग्या लोकांना एकीकडे गृहखाते अभय देत असतानाच, सांगलीत एका गरीब युवकाचा कोठडीत खून करण्यात येतो, ही बाब दुर्दैवी आहे. पोलिस आता सुपारी घेऊन काम करू लागल्याचे चित्रही राज्याने पाहिले आहे. अशा गोष्टींना आता राज्य शासनाने लगाम घालायला हवा.सुपारी घेऊन एन्काऊंटरचा संशय : पृथ्वीराज चव्हाणअनिकेत कोथळेचा कोठडीत केलेला खून आहे की सुपारी घेऊन पोलिसांनी केलेला एन्काऊंटर आहे, याविषयीची शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे पाहावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. चव्हाण यांनी सोमवारी सकाळी आमदार डॉ. पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांची भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. याप्रकरणी राज्य व केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे चव्हाण यांनी कोथळे कुटुंबीयांना सांगितले.थोडी जरी चाड असेल, तर मुख्यमंत्र्यांनी लवकर यावे!एवढी घटना घडूनही मुख्यमंत्री मौन बाळगून आहेत. पालकमंत्र्यांनाही या प्रकरणाकडे पाहावेसे वाटत नाही. त्यांना वेळसुद्धा नाही. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना आता थोडी जरी चाड असेल, तर त्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.नोकरी देऊ : कदमअनिकेतच्या नातेवाईकांनी त्याच्या पत्नीला नोकरी देण्याबाबत गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे सांगितले. परंतु नोकरी देता येणार नाही, असे केसरकरांनी सांगितले. शासन काय करते ते पाहू, अन्यथा अनिकेतच्या पत्नीला आम्ही नोकरी देऊ, असे आश्वासन आ. पतंगराव कदम यांनी दिले.

टॅग्स :Crimeगुन्हा